‘प्र’च्या कविता

Monday 17 January 2011

घरटे

बांधावे घरटे असे, झाड उरले नाही
पक्षी गेले दिगंतरा, पंखही उरले नाही.

उन्हात आता सावलीची, खात्री कोण देणार?
या पावसात भूमीत, एकही बीज मुरले नाही.

शब्द बंदिवान झाले, अन् अर्थ बेईमान
ओठांवरती कधीचे, गीत स्फुरले नाही.

तू जाता निघून, गावाचे स्मशान झाले
कोण म्हणतो तुझ्यासाठी, कोणीच झुरले नाही.

No comments:

Post a Comment